Ad will apear here
Next
मधुमेह विरुद्ध आपण
मधुमेह म्हणजेच डायबेटीसची रुग्णसंख्या भारतात सातत्याने वाढत आहे. मधुमेह हा हृदयरोगासारख्या अन्य आजारांनाही निमंत्रण देत असतो. म्हणून हा आजार टाळणे आवश्यक असते. आहार व जीवनशैलीतील बदलांमुळे ते शक्य होते. याविषयीची माहिती डॉ. अश्विन सावंत यांनी 'मधुमेह विरुद्ध आपण' या पुस्तकातून दिली आहे.

भारतातील अतिपोषण व कुपोषण या समस्या, श्रीमंतांना होणारा आजार अशी ओळख असलेला मधुमेह २० व्या शतकात मध्यमवर्गीय व गरिबांच्या घरातही स्थिरावला. त्याची कारणे, हा आजार अनुवांशिक, जनुकीय कि आहारजन्य, तो कोणत्या वयात होतो, मधुमेहाचा धोका कोणाला, स्थुलत्वासाठी 'बीएमआय' चाचणी, स्थुलत्वामुळे होणारे आजार, मधुमेहाची जीवनशैलीसंबंधित कारणे,

आहारासंबंधी कारणे, नवीन धान्य स्थूलत्वास व मधुमेहास कारण, दुध व दुधाच्या पदार्थांचे अतिसेवन, मैद्याचे अर्थकारण, साखर, गोड पदार्थ, मद्यपान यांचा परिणाम, मधुमेह म्हणजे काय, इन्सुलिन प्रतिरोध, 'पीसीओएस'ची लक्षणे, मधुमेहाचे पूर्वरूप, मधुमेहाचे प्रकार, प्रकार १ व २ मधील फरक गर्भपरणातील मधुमेह, आवश्यक चाचण्या, रक्तातील साखर कशी तपासावी, मधुमेहींसाठी आहार, व्यायाम आदींबद्दल अगदी सविस्तर मार्गदर्शन लेखकाने केले आहे.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZLJBC
Similar Posts
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ बाळाजी बाजीराव उर्फ थोरले नानासाहेब पेशवे यांचे धाकटे चुलतबंधू व त्यांना कायम साथ दिलेले सदाशिवरावभाऊ उर्फ भाऊसाहेब यांची आठवण फक्त एकाच घटनेवरून येते ती म्हणजे पानिपतची लढाई. हि लढाई 'भाऊं'मुळे मराठे हरले असा समज आजही आहे. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे सांगत कौस्तुभ कस्तुरे यांनी 'सकलराजकार्यधुरंदर
शिवराम   छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे. त्यांचे कार्यकर्तुत्व व गुण आजही आदर्श ठरतात. परकीयांच्या राज्यात हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवरायांनी पाहिले आणि ते साध्यही केले. हाच धागा अॅड. दादासाहेब राजेशिर्के यांना डॉ. रामचंद्र महाराज पारनेकर यांच्या कार्यात आढळला. त्यातून
असा हा राजहंस 'राजहंस' नावातच एक अदब, ऐश्वर्य जाणवते. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी या नावाचे सार्थक केले. संगीत नाट्यभूमीवर त्यांनी इतिहास रचला. मात्र या राजहंसला साथ देणारा दुसरा एक राजहंस होता, हे कित्येकांना माहिती नाही. बालगंधर्वांवर अपारंपार प्रेम करणारे त्यांचे कनिष्ठ बंधू म्हणजे व्यंकटेश श्रीपाद
वैदिक धर्माचरण भारतावर अनेक वर्षे परकी आक्रमणे होत राहिली. परकी सत्तांच्या गुलामगिरीत भारतातील धनसंपत्ती लुटण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कालांतराने पाश्चीमात्यांच्या अनुकरणामुळे भारतात. चंगळवाद फोफावला. या सर्वांत वैदिक संस्कृतीचा विसरा पडला, असे विचार व्यक्त करीत स्वदेशी धर्माचार्नाची गरज व आवश्यकता का आहे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language